चार अवस्थांचे गौड बंगाल
पारंपारिक शास्त्रा मध्ये जाणीव आणि तिच्या चार अवस्था मानल्या गेल्या आहेत. सत्य अवस्था हि या चार अवस्थांच्या पलीकडील अवस्था समजली जाते. ज्याला सत्याचा साक्षात्कार करावयाचा आहे त्याने या चार अवस्था पार करायच्या असतात असे पारंपरिक शास्त्र सांगते. तुर्या, सुशुप्ती, स्वप्न, जागृती या त्या वेगवेगळ्या अवस्था परंपरांनी मानलेल्या आहेत. त्या खऱ्या आहेत काय? आपला मी हा एक विचार आहे आणि त्याच्या मर्यादित अनुभवा मुळे तो स्वतः मर्यादित राहतो हे सर्वमान्य तथ्य आहे. जो मी स्वतः मर्यादित असतो तो अमर्यादित तत्वाला जानू शकत नाही हे सुद्धा सर्वमान्य तत्व आहे. असीमित सत्य आकलन होण्यासाठी आपण मी पणाच्या सीमित दृष्टी ने पाहू शकत नाही. आपल्या मी याचा सीमित दृष्टिकोन नाहीसा झाला तर आपण असिमीत अशा सत्य अवस्थेत होतो याचे आकलन होते. चार अवस्थांचे सत्य समजण्या साठी आपण दिवस आणि रात्र यांचे सत्य पाहूया. ते दोन वेगवेगळे आहेत की एक आहे की केवळ भास आहेत ते पाहूया. सूर्य उगवला की दिवस आणि सूर्यास्त झाला की रात्र सुरू होते. म्हणजे दिवस आणि रात्र हे सूर्याशी संबंधित आहेत. महाभारतातील जयद्रथ आणि अर्...